शाळा सुटल्यावर चड्डीवर कर्दुडा चढवून या असल्या मग्रुर ऊन्हात भर दुपारी बारा वाजता टाकळी च्या गाडीवाटेनं पायात चपला न घालता बैलगाडीच्या चाकाचा फुफोटा उडवत शेतात चालत जायचो.
चालता चालता त्याच फुफाटयातला बाबळीचा निबरढोक जुना काटा काचदिशी पायात मोडून मस्तकात कळ जायची.मोडलेला काटा काढायला काटयाची फांदी शोधत लंगडत भीरी भीरी हिंडायचो.
(तिथंच शिकलो काट्याने काटा काढायचा )
तिथंच रस्त्याकडेला मांडी घालुन पायाला थुंकी लावून काटा काढायला घ्यायचो.
काढलेला काटा तळहातावर घेवून पापणीचा केस खसकन तोडायचो.
तोडलेला पापणीचा केस काटयाला चिकटवून हळूहळू वर ऊचलायचो..
काटा ऊचलून वर यायचा...भारी वाटायचं
तेव्हा पापणीच्या केसानेही वेदना हलकी व्हायची, काटयासारखी... कारण तेव्हा व्यवहाराचा स्पर्श नं झालेली निरागस स्वप्नं होती ह्या डोळ्यात..ऊन्ह तेव्हाही होतंच इतकाच होत..आता डोक्याला टोपी डोळ्यावर गॉगल चढवूनही ऊन लागतं. भौतिकाची बाधा झाली की, सावलीही सळू लागते.
ऊन्हाची तर गोष्टच वेगळी आहे मित्रांनो....
जय हिंद
Comments
Post a Comment